महायोगिनी अक्कमहादेवी जीवनचरित्र | Akkamahadevi Jeevana Charitra

बालपण

अक्का महादेवीचा जन्म कर्नाटक राज्यात शिमोगा जिल्ह्यातील तालुका शिकारी या उडुतडी गावी झाला होता.अक्का मातोश्रींच्या वडिलांचे नाव होते निर्मल शेट्टी व आईचे नाव सुमती देवी होते. निर्मल शेट्टी हे मोठे व्यापारी होते.त्यांनी सचोटीने व्यापार करुन संपत्ती, प्रतिष्ठा आणि समाजात मान मिळविला होता.ते अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते. त्यांना पूजाअर्चा करणे,ध्यान करणे अतिशय आवडत असे. गावाजवळील चन्नमल्लिकार्जुन भगवान हे त्यांचे आराध्य होते.जवळच एक विरशैव संप्रदायाचा मठ होता. शिवाचार्य नावाचे एक महान त्रिकालज्ञ साधुपुरुष तेथील मठाधिपती होते. निर्मल शेट्टी व सुमती देवी लग्नाला बराच काळ लोटला होता तरी पण अजुन त्यांना संतांन प्राप्ती झाली नव्हती.याचे शल्य सदैव त्यांना सतावत होते.सुमती देवी यांना हे दु:ख सदा हृदयात बोचत असे.त्या पुत्रप्राप्तीसाठी भगवान चन्नमल्लिकार्जुनाच्या चरणी सतत प्रार्थना करित असत. पुढे विरशैव मठाधिपती असलेल्या शिवाचार्यांनी श्री बसवेश्वरांच्या लिंगायत धर्माची दिक्षा घेतली व ‘गुरुलिंगदेव’ हे नाव धारण केले. एक दिवस गुरुदेव लिंगदेवांच्या दर्शनास गेले असता गुरुदेव सुमती देवीला म्हणाले , “मुली शिवाच्या इच्छेप्रमाणे तुला एक अलौकिक कन्यारत्न होणार आहे.ती आपल्या सामर्थ्याने तुमच्याच कुळाचा नाही तर सार्‍या मानवकुळाचा उद्धार करणार आहे.गुरुदेवांचे हे शब्द ऐकून दोघांनाही अतिव आनंद झाला.गुरुदेवांचा आशिर्वाद फळाला आला व लवकरच सुमती देवीला दिवस गेले. लवकरच शुभमुहूर्तावर सुमती देवीची पोटी एक अतिशय सुंदर कन्यारत्न जन्मास आले.पुढे या बाळाला थोर संत जंगमस्वामी त्रिकालज्ञ श्रीमुरुळसिद्धेश्वर महाराज यांनी आपला कृपा आशिर्वाद दिला व कानात गुरुमंत्राचा उच्चार केला होता.श्री महाराजांनीच या दिव्य कन्येचे नाव महादेवी असे ठेवले .

कौटुंबिक माहिती

महादेवी मातोश्रींच्या जिवनाला सर्वात मोठे वळण देणारी एक अतिशय महत्वाची घटना घडली.राजा कौशिक हा आपल्या लवाजम्यासह उडूतडी या गावातून जाणार होता. त्यामुळे सर्व गाव सज्ज झाले.थोड्याच वेळात राजाची मिरवणूक त्यांच्यापुढून जाऊ लागली.राजाची नजर तेथे उभ्या असलेल्या महादेवींवर गेली.त्यांच्या तेजस्वी,सात्विक , सुंदर रुपाकडे तो पहातच राहीला.महादेवींच्या सौंदर्यावर भाळून राजा आपले भान हरपून बसला.त्याला आता त्याच सुंदर युवतीचा चेहेरा डोळ्यापुढे दिसु लागला.आपल्या सेवेकांकडून त्याने महादेवींची सर्व माहिती काढली.राजाने सरळ आपल्या घरातील स्त्रीयांना महादेवी कडे पाठवून लग्नाची मागणीच केली व महादेवीला पट्टराणी करण्याचे आश्वासन ही दिले.पण ही मागणी महादेवींनी साफ धुडकावून लावली.ही मागणी धुडकावल्यामुळे आता राजद्रोच्या नावाखाली राजाच्या संतापाला सगळ्यांना तोंड द्यावे लागेल हे महादेवींना माहिती होते.त्या ही विवंचना घेऊन गुरुदेवांकडे गेल्या.सर्व हकिकत गुरुदेवांना सांगितले व यातुन बाहेर निघण्याचा मार्ग ही विचारला.गुरुदेवांनी यावर एक युक्ती सांगितली.गुरुदेव म्हणाले, “महादेवी तु राजाकडे जा.तिथे राहा पण त्याआधी काही अटी त्यांच्यापुढे मांड.जर त्या अटी मान्य असतील तरच तुझ्यासोबत मी राहेल असे ही त्याला निक्षून सांग आणि जर एकाही अटींचे उल्लंघन झाले तर मी तात्काळ राजवाडा सोडून निघून‌ जाईल असे सांग.त्या अटी होत्या,वर्षभरात मी एक महिना व्रतस्थ असते त्या काळात मी कुणालाही स्पर्ष करत नाही व कुणी मला स्पर्ष करणे अगदी वर्ज आहे,त्यावेळी माझा आहार हा दूध व फळांचा असेल ,पुर्ण वेळ मी सोवळ्यातच असेन,मला या काळात इष्टलिंग,जंगम पूजा करायची असेल,माझ्या साधनेत कुणाचाही व्यत्यय आणता कामा नये.सायंकाळी पहिल्या प्रहरापासून ते शेवटच्या प्रहरापर्यंत कोणाचेही मी मुखदर्शन करणार नाही.यातील एकही अट जर तुटली‌ तर मी तात्काळ निघून जाईल.या सर्व अटी सांगून काही दिवसांत महादेवी राजवाड्यात मेन्यात बसून निघून गेल्या.

पुढे जंगम पुजा करण्यासाठी चार जंगम राजदरबारात येणार होते.त्यातील  निजलिंगदेव हे मुख्य होते.महादेवींनी महालात सर्व पुजेची विशेष तयारी ठेवली होती‌ व तिने सर्वांचे यथोचित स्वागत ही केले.राजाची वासना शमन होऊन त्याला सन्मार्ग दिसो अशी ही कामना तिने निजलिंगदेवांकडे केली.पुढे एकदिवस रात्री सर्वजन अगदी भावपूर्ण अवस्थेत भजन करु लागले.त्यामुळे राजाला संताप आला.त्याने जंगमांना तात्काळ महालाबाहेर जाण्यास सांगितले.राजाने महादेवीच्या चारित्र्यावर ही शंका घेतली.निजलिंगदेव, जंगमांचा अपमान आणि आपल्या चारित्र्यावर घेतलेल्या संशयामुळे महादेवी खुप रागावल्या.पण तरीही राजाला तिनं चुका माफ म्हणून त्यांनी अभय दिले होते.पुढे काही दिवसांनी भावसमाधीत लिन असलेल्या महादेवींचे ते तेजस्वी रुप बघून राजाच्या मनात कामवासना उत्पन्न झाली व त्यातून त्याने महादेवीला स्पर्ष केला.झालं मग तर ,महादेवींच्या क्रोधाला पारावार उरला नाही.तिने राजाला म्हटले , “मुर्खा तुला या देहावरच प्रेम आहे ना तर बघ हा देह .माझा स्वामी पती तो चन्नमल्लिकार्जुन आहे.तो दिगंबर असतो मी ही आता दिगंबर होते.बघ काय बघायचे ते बघ.या वस्त्राखाली आहे हा हाडामासाच्या अस्तिपंजर देह,गोरं कातडं ,मलमूत्राचं डबकं,पंचभुतात नाहीसी होणारी ही काया.” असे म्हणत महादेवी ने आपले सर्व वस्त्र काढले व राजाच्या तोंडावर फेकले. त्या राजाला म्हणाल्या, “अविवेकी मुर्खा,हे शरीर पाहण्यासाठी ,त्याला स्पर्श करण्यासाठी तू आतुर झाला होतास ना? मी या वस्त्रात सुंदर दिसते ना? आता घे एकदा शेवटचे बघून.त्या वस्त्रांचा तात्काळ त्याग करत महादेवी तशाच नग्न अवस्थेत आपल्या लांब अशा केशसंभाराने अंग झाकून राजमहालाबाहेर निघाल्या.त्या राजदरबारातून तशाच अवस्थेत बाहेर जाऊ लागल्या.सर्व दरबार त्यांना बघून‌ घाबरला ,एका जागी खिळून गेला.कुणाचीही त्यांना थांबविण्याची हिंमत झाली नाही.त्या भर बाजारपेठेतून निघाल्या.लोक‌ तर त्यांना बघून अवाक झाले.महादेवींनी भगवंतांसाठी आता आपल्या लाज लज्जेचाही पूर्णपणे त्याग केला होता.प्रखर ,वैराग्य अंगी बाणलेल्या,भगवंतांशी एकनिष्ठ झालेल्या महादेवी आता गुरुदेवांजवळ येऊन पोचल्या.गुरुदेव त्यांना अशा अवस्थेत बघून आश्चर्यचकित झाले.त्यांनी गुरुदेवांना आता मी बसवण्णांकडे जाणार आहे ,मला तसा इष्टलिंगाने आदेश‌ दिला असल्याचे सांगितले.आता या वस्त्राचा मी त्याग केला आहे.स्त्री देहाकडे काही दृष्टीने पाहणार्‍या लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी मी याचा त्याग केला आहे.पण गुरुदेवांच्या आज्ञेने त्यांनी एक घोंगडी त्यांनी अंगावर पांघरली.

कल्याण, श्रीगिरीपर्वत, कर्दळीवनात प्रस्थान

आई वडिलांचा ,गुरुदेवांचा निरोप घेऊन त्या तडक कल्याणला निघाल्या.एवढा दूरवरचा प्रचंड प्रवास करत करत महादेवी मार्गक्रमण करु लागल्या.भिक्षा मागत ,मिळेल तिथे आश्रय घेत त्यांचा हा प्रवास सुरु होता. हे सर्व दिव्य करीत असतांना‌ त्या किती चन्नमल्लिकार्जुनांच्या चरणी शरणागत होत्या याचा साधा विचार ही आपण करु शकणार नाही.या प्रवासात भगवान सदाशिवाने त्यांची हर एक प्रकारे कठिण अशी परिक्षा घेतली.इकडे त्रिकालज्ञानी बसवण्णांना हा सर्व वृतांत ज्ञात होताच.त्यांनी इतर संतांना , सेवकांना आपल्या कडे एक महान शिवशरणी महादेवी येणार असल्याचे आधीच सांगितले होते. महादेवी तिथे पोचल्यावर त्यांचे यथोचित स्वागत करण्यात आले. तेथील प्रसादमंदिरात त्यांना मोठ्या सन्मानाने नेण्यात आले.पुढे त्यांचे प्रवचन झाले व दुसर्‍या दिवशी त्या बसवण्णांच्या भेटीसाठी कल्याणला निघाल्या. कल्याण ला पोचल्यावर महादेवींना कठोर अशा परिक्षेला सामोरे जावे लागले.त्या सर्व दिव्यातून ही पार होत महादेवी बसवेश्वरांना शरणं गेल्या.पुढे त्या बसवेश्वरांच्या अनुभवमंडपातील अतिशय महत्वपूर्ण व्यक्ती झाल्या .त्यांनी केलेल्या रचना या तत्कालीन संत मांदियाळीत महत्वपूर्ण रचना म्हणून गणल्या जाऊ लागल्या.त्यांच्या वचनांची थोरवी सर्वत्र एकमुखाने गायली जाऊ लागली.अखंड पाच वर्षे महादेवींची कल्याणला बसवेश्वरांच्या मार्गदर्शनाखाली साधना सुरु होती.त्यांचे शिवतत्वाशी एकरुप होत होते.त्या दिवसेंदिवस अंतर्मुख होऊ लागल्या.पुढे भगवान शिवांनी तिला साधनेवेळी संकेत देऊन सांगितले होते की आता आपल्या निजस्थानी तुला लवकरच यायला हवे.त्यासाठी कर्दळीवनातील अतिदुर्गम स्थानी जायला त्या सज्ज ही झाल्या.बसवण्णांची व इतर सर्वांची त्यांनी यासाठी आज्ञा मागितली.सर्वजन या विचारांनी हेलावले. चन्नमल्लिकार्जुनाच्या भेटीसाठी आसुसलेली महादेवी आता श्रीगिरीपर्वत ओलांडून, चन्नमल्लिकार्जुनालाही ओलांडून कर्दळीवनात प्रस्थान करणार होती.महादेवी आपल्या आराध्यांशी एकरुप होण्यासाठी आता कर्दळीवनात निघाली.सर्वांनी जड अंतःकरणाने त्यांना निरोप दिला.ही योगिनी आता आपल्या परमध्येयाकडे निघण्यास सज्ज झाली.त्या मोठा खडतर प्रवास करीत ,दिव्य पार करित श्रीगिरी पर्वतावर पोचल्या.तेथील भयंकर अरण्य,पर्वतरांगा त्यांनी लिलया पार केल्या.पर्वतावर स्थित असलेल्या भगवान मल्लिकार्जुनांच्या गाभार्‍यात त्या पोचल्या. श्रीदेवांचे दिव्य लिंग बघून त्यांना तात्काळ समाधी लागली. त्या भावसमाधीतून बाहेर आल्यावर दुसर्‍या दिवशी त्यांनी पाताळगंगेत स्नान केले.तेथील पुजार्‍यांना कर्दळीवनात जाण्याचा रस्ता विचारला व देवांची आज्ञा घेत त्या मार्गस्थ झाल्या.कर्दळीवनाचा अतिशय भयान , महाकठीण , अतिदुर्गम रस्ता पार करत त्या एका गुफेजवळ आल्या.ते स्थान त्यांनी आता आपल्या तपासाठी निवडले.काही दिवसांनी वैराग्य उत्पन्न झालेला राजा कौशिक व महादेवींच्या प्रिय सखी शिवानी ही तेथे पोचले.त्या दोघांनाही इष्टलिंगाची दिक्षा महादेवींनी दिली.त्यानंतर महादेवी आपल्या कठोर साधनेत एकरुप झाल्या.त्यांनी सर्वस्वाचा त्याग तर केव्हाच केला होता.आता हा देह ही त्या चन्नमल्लिकार्जुनाला अर्पण करणार होत्या.त्या ध्यानाच्या अखंड समाधीत लिन झाल्या व लवकरच ध्यानावस्थेत त्यांनी आपला देहही शिवयोग साधून शिवार्पण केला. अशी ही महायोगिनी अक्का महादेवींची दिव्य चरित्र गाथा.

Please Follow US & Like Me

Leave a Comment